लोहारा -आपल्या घरातील स्त्री बाहेर गेली आणि घरी परत यायला तिला उशिर झाला की जीव कासाविस होतो.रात्री अपरात्री काही झालं तर? मात्र ती घरात सुखरूप आल्या नंतर आपली काळजी संपते.घरातल्या चार भिंतींच्या मर्यादेत ती सुरक्षित असते.पण अशाच असुरक्षित व धोक्याच्या कित्येक स्त्रिया रात्री भटकत असतात;ती कुणाची तरी आई, मुलगी,अथवा पत्नी, किंवा बहीण असेल.पण त्यांची वाट पाहणारं असं कुणीच नाही.अशा अनेक महिला ज्यांना त्यांच्या आपल्या लोकांनीच व समाजाने देखील सोडून दिलं आहे.कारण त्या आजारी आहेत मनोविकृत आहेत.देवगाव रंगारी ता.कन्नड या भागात काही दिवसांपासून मानसिक आजाराने ग्रस्त एक महिला फिरत असून,लोकांना दगड मारने,अंगावरचे कपडे फाडने ह्या मानसिक अवस्थेत आहेत.हि बाब साय्यक पोलीस निरिक्षक संजय आहिरे यांच्या लक्षात आली.त्यानी त्या मनोरुग्ण महिलेची चौकशी केली. असता तीचे वडील मयत आहे व आई वृध्द आहे.घरची परिस्थिती जेमतेम आहे.त्यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती देवुन त्यांच्या पुनर्वसनासाठी काही समाजिक संस्थेचे स्वयंसेवक काम करते का त्यात
सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि माणुसकी रुग्ण समूहा चे सामाजसेवक श्री सुमित पंडित यांना माहिती दिली.परंतु नियमानुसार जिल्हा सत्र न्यायालयाची परवानगी घेऊन त्यांना येरवडा मेंटल हाँस्पिटल पुणे येथे पोचते करणे खुप आवश्यक आहे,कारण असे कळले आहे की दुर्दैवाने औरंगाबाद येथे अश्या मनोरुग्ण महिलांसाठी पुनर्वसनाची काहीच व्यवस्था नाही. देवगाव रंगारी पोलीस कर्मचाऱ्यांना तीला घाटि रुग्णालयात दाखल केले.गेली आठ दिवसाच्या घाटि रुग्णाल व मा.न्यायलयाच्या प्रोसेजर प्रमाणे तीला येरवडा मेंटल हाँस्पीटल येथे ठेवन्यासाठि मा.न्यायलयाने दि १७-१०-२०२० रोजी परवानगी दिली.व प्रावेट गाडिने तीला येरवडा मनोरुग्णालयात पुढिल उपचारासाठी ठेवन्यात आले या सामाजिक कार्यात साय्यक पोलीस निरीक्षक संजय आहिरे,हेडकाँस्टेबल आप्पासाहेब काळे,सेक जकिया,पोलीस काँस्टेबल एल बी लहाणे,होमगार्ड एस पी सातदिवे,माणुसकी समुहाचे सुमित पंडित लक्ष्मण बोर्डे,आदिंनी मेहनत घेतली.
एक सामाजिक दायित्व व कर्तव्य म्हणुन मनोरुग्ण महिलेला दिला न्याय
एक सामाजिक दायित्व व कर्तव्य स्वीकारणारे याचं उत्तर माणुसकी शिवाय दुसरं काय असेल.ती महिला मानसिक आजाराने पीडित आहेत.हा त्यांचा गुन्हा आहे का ?
समाजाने वाळीत टाकलेल्या ह्या महिलांवर शारीरिक आत्याचार होत नसतील का ? अमानुष लोकांच्या वासनेच्या शिकार झालेल्या ह्या महिलांपासून जन्माला आलेल्या अनाथ मुलांचा भार कोणी सांभाळावा
प्रश्न ह्या एका महिलांचाच नाही, तर अजून किती असतील.ज्या अशाच अबोध आपल्या देहाला बेसुध मिरवत असतील समाजातील वाईट नजरे सामोर.
मग यांच्यासाठी एक मायेचं आपुलकीचं घर आहे का ? यांना असच उकिरड्यावर ठेवायचे काय ? समाजाच दायित्व काहीच नाही का ? हे मनोरुग्ण देखील आधी सामान्य जीवन जगत होते. जीवनात संकट सांगुन येत नसतात.आपण आपल्या मर्यादा जर खरच वाढवल्या आणि मदतीचा हात सामाजिक संस्थाना लावला,जे अशा स्वरूपाचं काम करण्यास उभे होत आहेत.तेव्हा खऱ्या अर्थाने मनोरुग्णाचा मानसिकतेत स्थिरता येईल. आणि समाजाची खरी मानसिक विकृत वृत्ती नष्ट होईल.
—-संजय आहिरे साय्यक पोलीस नीरीक्षक देवगाव रंगारी