मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिनांक 22/11/2020 रोजी रात्री ८ वाजता जनतेशी संवाद साधला. त्यात त्यांनी जनतेला काही गोष्टी सांगितल्या . मंदिर , चर्च , मशिदित जास्त गर्दी करू नये , तसेच कार्तिकी वारित गर्दी करू नका . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असेही म्हणाले की , सर्व गोष्टी चालु केलेल्या असल्या तरी अजून कोरोना गेलेला नाही आहे . गर्दी केल्याने कोरोना जाणार नाही वाढणार आहे . कोरोना ची दुसरी लाट म्हणजे त्सुनामी असणार आहे . कोरोनाची अद्याप लस आलेली नाही आहे . जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी सुरक्षितता बाळगाली पाहिजे . विनाकारण घराबाहेर पडू नये . मास्क वापरने , सॅनिटाइजर चा वापर करणे तसेच सोशल डिस्टंगसिंग चे पालन करणे. इत्यादी गोष्टीं चे पालन आपण सर्वाना केले पहिजे . राज्याची आरोग्यसेवा सज्ज आहे परंतु आपण सर्वांनीही अधिक काळजी घेतली पाहिजे . जर कोनाला कोरोना चे लक्षणे दिसले तर त्या व्यक्तीने तात्काळ चाचणी करून घ्यावी कारन पोस्ट Covid चे परिणाम भयंकर आहेत. महाराष्ट्राने एकदा कोरोना वर नियंत्रण मिळवलं आहे . महाराष्ट्रन प्रत्येक लढयात यश मिळवल आहे . करून दाखवल्याशिवाय महाराष्ट्र राहत नाही असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले .